निमगाव भोगी, ता. शिरूर, जि. पुणे – निमगाव भोगी गावातील ग्रामसेविका के. आर. गवळी यांच्या कार्यालयीन वेळेतील अनुपस्थिती, वेळेचे उल्लंघन आणि महत्त्वाच्या कामांतील दिरंगाईमुळे काही ग्रामस्थ अक्षरशः हैराण झाले होते.पण याच ग्रामस्थांना आता ग्रामसेविकाचा कळवळा येऊ लागला आहे.
पत्रकार म्हणून आम्ही जेव्हा यासंदर्भात माहिती घेतली, तेव्हा गावकरी दुहेरी भावनेत अडकलेले दिसले – एकीकडे त्यांना ग्रामसेविकेबद्दल सहानुभूती आहे, तर दुसरीकडे त्यांच्या हलगर्जीपणामुळे होणाऱ्या अडचणींमुळे संतापही आहे.
“वेळेवर जन्म-दाखले मिळत नाहीत, मृत्यू नोंदवले जात नाहीत. इतकी मूलभूत कामे रखडत आहेत,” अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
काही जण तर म्हणाले, “त्यांना काही अडचण असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगावं. पण आता मात्र कारवाई होणं गरजेचं आहे. कळवळा बाजूला ठेवून उत्तरदायित्व मागायला हवं.”
पत्रकार म्हणून आम्ही ही बाब गांभीर्याने घेत असून, प्रश्न एका व्यक्तीचा नसून व्यवस्थेचा आहे. जेव्हा कर्मचारी जबाबदाऱ्या झटकतात, तेव्हा त्याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसतो. शासकीय सेवा ही सहवेदना नाही, तर शिस्तीवर चालणारी यंत्रणा आहे.
गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. , “कळवळा आहे, पण नियम मोडणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आम्हालाच उभं राहावं लागेल.”
ग्रामसेविकेचा ग्रामस्थांना कळवळा.
Reviewed by mohammad shaikh
on
May 22, 2025
Rating: 5