डॉ. शिवाजी काळे यांचे शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात कार्य भूषणावह - आ. लहूजी कानडे
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
समाजात जागृती निर्माण करणे हे साहित्यिकांचे ध्येय असते. तो जग सुंदर करण्यासाठी धडपडतो. साहित्यिक हे समाजप्रबोधनाचे शब्ददूत असतात, अशा वाटेवर डॉ. शिवाजी काळे यांनी ग्रामीण भागातून जीवन उभे करून आदर्श निर्माण केला, त्यांचे शैक्षणिक आणि साहित्यक्षेत्रातील कार्य भूषणावह असल्याचे गौरवोद्गार आमदार लहू कानडे यांनी काढले.
श्रीरामपूर येथील बेलापूर रोडवरील ऑकेजन बँक्वेट हॉलमध्ये डॉ. बाबुराव उपाध्ये संपादित' मराठी ग्रामीण कथा: शोध आणि बोध' या डॉ. शिवाजी काळे गौरवग्रंथाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार लहू कानडे बोलत होते. अध्यक्षस्थानी ऍड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्यकारिणी चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. प्रमुख उपस्थिती म्हणून तेलकुडगांव येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील, राहाता येथील शारदा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य रमेशभाऊ शिंदे पाटील, माजी प्राचार्य शंकरराव अनारसे, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक,सचिव सुखदेव सुकळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. स्व.आसराबाई काळे व स्व. एकनाथराव काळे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय सूचना कवयित्री संगीता फासाटे यांनी मांडली तर स्वामीराज कुलथे यांनी अनुमोदन दिले. ग्रंथ संपादक डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांची ओळख करून दिली. गौरवमूर्ती डॉ. शिवाजी काळे यांनी भावपूर्ण शब्दांत मनोगत व्यक्त करून पाहुण्यांचे सत्कार केले. मान्यवरांच्या हस्ते ' मराठी ग्रामीण कथा: शोध आणि बोध' या गौरव ग्रंथाचे प्रकाशन झाले. यावेळी स्वामीराज कुलथे, बापूसाहेब सदाफळ यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार लहू कानडे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत आता साहित्यिकांनी आपला आवाज मुक्त केला पाहिजे. जे जे अयोग्य त्यावर मनापासून लिहिले पाहिजे. धर्म ही समाजाच्या, व्यक्तीच्या उद्धारासाठी निर्माण झालेली एक मूल्य जाणीव आहे पण जेव्हा धर्मांधता निर्माण होते तेव्हा विकृती आणि दहशतवादी मनोवृत्ती वाढीस लागते. साहित्यिकांनी या सर्व धार्मिक, सामाजिक प्रवृत्तीवर वास्तवदर्शी लिहिले पाहिजे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे दीड दिवस शाळेत गेले पण अजरामर साहित्य लिहिले. आज मात्र फेसबुक, व्हाटसप हे विद्यापीठ झाले आहे, विविध चॅनेल्स आले आहेत. वाचन संस्कृती विकसित झाली पाहिजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले ते समजून घेतले पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी पसायदान सांगितले हेच तर खरे मानवी संस्कृतीचे संविधान आहे, हे सर्व समजून घ्या. चांगल्याला चांगले म्हणणे ही संस्कृती वाढीस लागली की खरे साहित्यमूल्य समजेल या वाटेवर डॉ. शिवाजी काळे यांनी निर्माण केलेल्या कथा अशाच वास्तवदर्शी असल्याचे सांगून त्यांनी डॉ. शिवाजी काळे व संपादक डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा सत्कार केला.
यावेळी प्राचार्य डॉ. एकनाथ ढोणे,प्रा. दिलीप सोनवणे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब बावके, प्रा. शिवाजीराव बारगळ, कवी पोपटराव पटारे, डॉ. शरद दुधाट, संदीप बोरुडे, सुनीता पटारे, सौ. मंदाकिनी उपाध्ये, सौ. सुप्रिया ताके, अजित ताके, सुकन्या काळे, सुयश काळे, डॉ. रामकृष्ण जगताप, अंबर काळे, गीताराम नरवडे, डॉ. संदीप तपासे, प्रा.स्वप्निल विखे, शिवाजी देठे, किशोर गाढेगुरुजी, स्नेहलता कुलथे, श्रद्धा कुलथे, प्रविण साळवे, गणेशानद उपाध्ये , शिवाजी देठे, शारदा देठे, ज्ञानाई शिंदे ,प्रदीप मुसमाडे , दत्तात्रय आंबेडकर, श्रद्धा पाटील , यशवंत बागुल , पूजा बागुल आदी उपस्थित होते.
रमेशभाऊ शिंदे, साहेबराव घाडगे पाटील यांनी डॉ. शिवाजी काळे, मोहिनी काळे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. प्राचार्य टी.ई. शेळके यांनी अध्यक्षीय भाषणातून श्रीरामपूर हे बाहेरून आलेल्या लोकांचे गाव असून येथील लोक मनापासून सर्वांवर प्रेम करतात, त्यातूनच या शहराचा विकास झाला आहे. डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ.शिवाजी काळे, ऍड., रावसाहेब शिंदे, सुखदेव सुकळे, प्राचार्य शंकरराव अनारसे इत्यादी अनेक साहित्यिक, कलावंत, इतर सर्व क्षेत्रातील लोकांच्या योगदानातून हे शहर घडले आहे. घडत आहे, लहू कानडे यांच्यासारखे तळमळीचे एक साहित्यिक आमदार शहराला लाभले,त्यामुळे या पुस्तक प्रकाशनाला प्रतिष्ठा लाभली असल्याचे त्यांनी सांगून डॉ. शिवाजी काळे, सौ. मोहिनी काळे यांचे अभिनदन केले. सूत्रसंचालन संतोष मते व संगीता फासाटे यांनी केले तर आसरा प्रकाशनाच्या प्रकाशिका सौ. मोहिनी काळे यांनी आभार मानले.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११