राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहेगाव, पुणे यांच्याकडून शेतकरी संरक्षण कवचची निर्मिती
पुणे दि. (27 मार्च )शेतकरी बांधवांसाठी संरक्षणात्मक व आरामदायी साधनांची निर्मिती
राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोहेगाव, पुणे या महाविद्यालयाने शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त संरक्षणात्मक व आरामदायी साधनांची निर्मिती केली आहे. विशेषतः शेतकऱ्यांना उन्हापासून संरक्षण व दीर्घकाळ खुर्पी चालवताना होणाऱ्या गुडघ्याच्या तणावापासून आराम मिळावा, यासाठी हे उपक्रम राबवले आहेत.
शेतकऱ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी आणि त्यांच्या कामातील सोयीसाठी विकसित करण्यात आलेल्या या उपकरणांचे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत:
1. उन्हापासून संरक्षणासाठी फार्म-छत
फायदे:
• थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण – शेतात दीर्घकाळ काम करताना डोके व चेहरा उन्हामुळे तापतो, त्यामुळे उष्माघात, डिहायड्रेशन आणि त्वचेसंबंधी त्रास होऊ शकतो. ही छत्री वापरल्याने थेट सूर्यप्रकाशाचा परिणाम टाळता येईल.
• हलकी आणि हाताळायला सोपी – पारंपरिक छत्री हातात धरून काम करणे शक्य होत नाही, त्यामुळे ही छत्री डोक्यावर परिधान करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. त्यामुळे हात मोकळे राहतील आणि सहजतेने काम करता येईल.
• शरीराचे तापमान नियंत्रित राहते – जास्त उष्णतेमुळे घाम येतो आणि थकवा वाढतो. ही छत्री वापरल्याने शारीरिक थकवा कमी होईल आणि उत्पादकता वाढेल.
2. बसण्यासाठी फार्म-स्टूल
फायदे:
• गुडघे आणि पाठदुखीपासून संरक्षण – खुर्पी चालवताना सतत खाली वाकावे लागते, ज्यामुळे गुडघे, पाठ आणि कंबरदुखी होऊ शकते. हे स्टूल वापरल्याने शारीरिक तणाव कमी होईल.
• सतत उभे राहण्याचा त्रास टाळता येईल – लांब वेळ एका स्थितीत राहिल्याने स्नायूंवर दडपण येते. स्टूल वापरल्याने शेतकऱ्यांना बसून आरामात काम करता येईल, त्यामुळे शरीरावरचा ताण कमी होईल.
हलके आणि पोर्टेबल – हे स्टूल सहजपणे कुठेही नेता येते आणि आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार वापरता येईल.
आरोग्यावर होणारे परिणाम:
• स्नायूंच्या आणि सांध्यांच्या समस्या कमी होतात.
• थकवा आणि उष्णतेमुळे होणारे आजार टाळता येतात.
• शेतातील काम अधिक सोयीस्कर आणि कार्यक्षम बनते.
• शारीरिक त्रास कमी झाल्याने कामाचा वेग आणि उत्पादनक्षमता वाढते
• या उपकरणांचा वापर करून शेतकऱ्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि त्यांचे काम अधिक सोयीस्कर होण्यास मोठी मदत होईल. असे आव्हान प्राध्यापक प्रा.ऐश्वर्या रेड्डी, प्रा. अजिंक्य साटम, डॉ. काशिनाथ मुंडे (प्राचार्य) यांनी केले