Breaking News

हृदय पिळवटून टाकणारी घटना ७ वर्षाच्या मुलाला बिबट्याने नेले आईच्या नजरेसमोरून उचलून, मुलाचा दुर्दैवी मृत्यू ; मांडवगण फराटा येथील प्रकार

 अक्षय टेमगिरे/



रांजणगाव गणपती :शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील दगडवाडी रोड गोकुळ नगार शिवारात शुक्रवार (दि.१८) रोजी रत्री दहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वन्स राजकुमार सिंग (वय. ७वर्षे)मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


 


याबाबत सविस्तर माहिती आशी की मांडवगण फराटा येथील दगडवाडी रोड, गोकुळनगर येथे संदीप अशोक घाडगे यांचे उसाचे गुऱ्हाळ आहे. या गुऱ्हाळवर राजकुमार नथू सिंग हे कुटुंबासमवेत कामाला आहेत. राजकुमार सिंग व त्यांची पत्नी रेखा यांच्यात शुक्रवारी घरी असतानाच घरगुती कारणावरून किरकोळ वाद सुरू होता. स्त्रीच्या वेळी आई पुढे चालत असताना मागुन त्यांचा वन्स हा मुलगा येत होता. आईने मागे येणा-या मुलाचा जोराचा रडण्याचा आवाज आला असता त्यावेळी त्यांना बिबट्या निदर्शनास आला.


 यावेळी बिबट्याने आईच्या डोळ्यासमोरच चिमकल्यावर हल्ला करत उसाच्या शेतात फरफटत नेले. त्यानंतर आईने मोठ्याने आरडाओरडा केला. यावेळी उपस्थित असणा-या गु-हाळ कामगार, उसतोड कामगार व उपस्थित असणा-यांनी शोध घ्यायचा प्रयत्न सुरु केला. दरम्यान पोलिस व वनविभागाला ही कळविण्यात आले. रात्री उशिरा चिमुकल्याला गंभीर जखमी अवस्थेत शोधण्यात यश आले. दवाखान्यात उपचारांसाठी नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच मुलाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


दरम्यान मांडवगण फराटा परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणातआहे. अनेक ठिकाणी उसाची तोड सुरू आहे. सातत्याने बिबट्या हा नागरिकांना निदर्शनास येतो मात्र त्यावर ठोस उपाययोजना केल्या जात नाही. अनेक नागरिक झालेल्या प्रकाराने भयभीत झाले आहे. याबाबत गुऱ्हाळचालक संदीप अशोक घाडगे यांनी पोलिसांत खबर दिली आहे.





मागील 15-20 दिवसापासून बिबट्या मांडवगण फराटा, गोकुळ नगर, इनामगाव रोड, गायकवाड मळा, घाडगे तळई, ता.शिरुर परीसरात दिसत आहे. 



 प्रशासनाला, वनविभागाला वारंवार कळविण्यात आले होते, तक्रार देण्यात आली होती, परंतु प्रशासन/वनविभाग यांनी यावर काहीच उपाययोजना केल्या नाहीत, आज वन विभागाला विनंती आजून किती हल्ले होण्याची वाट पाहणार आहात.?




शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीदेखील शेतात जावे लागते. यावर उपाय करणे गरजेचे. बिबट्याच्या भीतीमुळे ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. बिबट्याची दहशत अजून किती दिवस सहन करावी लागणार असा प्रश्न मांडवगण फराटा ग्रा



मस्थांना पडला आहे